पत्रकारावर गुन्हा दाखल करताना खातरजमा करा, खटाव तालुका पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

 

 १) खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसिलदार बाई माने यांना निवेदन देताना तालुक्यातील पत्रकार


२) पंचायत समिती परिसरातील स्तंभाला अभिवादन करताना खटाव तालुका पत्रकार संघाचे सदस्य 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज : पत्रकार तुषार खरात यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणतीही खातरजमा न करता अटक केली. त्या निषेर्धात खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने महसुल व पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन दिले .
 यावेळी औंध , मायणी , कातरखटाव व वडूजचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते . याप्रसंगी प्रारंभी खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पंचायत समिती परिसरातील स्तंभाला अभिवादन करण्यात आले.तदनंतर फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, दहिवडी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व तहसिलदार बाई माने यांना संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले . माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे ना. जयकुमार गोरे यांची यूट्यूब चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांनी विविध बातम्या प्रसिद्ध करून बदनामी केल्या प्रकरणी हक्कभंग दाखल केला . व्यक्तिगत बदनामी गुन्हा दाखल करणे हे क्रमप्राप्त होते . मात्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अँट्रासिटी , खंडणी व विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून खरात यांना अटक करण्यात आली . वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने संबंधीत गुन्ह्याची खातरजमा करणे आवश्यक होते . विविध गुन्हे दाखल करून व अटक करून पत्रकार खरात हे तुरुंगाच्या बाहेर येऊच शकणार नाही अशीच व्यवस्था केली की काय अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे . सुडबुद्धीने एखाद्या पत्रकाराला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असताना हुतात्मा भूमी म्हणून राज्याला परिचीत असणाऱ्या खटाव तालुक्यातील पत्रकार हा अन्याय कदापीही  सहन करणार नाहीत. यासाठी लोकशाहीच्या मार्गाने विविध तीव्र आंदोलने उभारण्याचा इशारा खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला .
या अन्याया विरोधात अटकेत असलेले पत्रकार तुषार खरात यांनी तुरुंगातच अन्न - पाणी त्याग केल्याची माहिती सुत्रांकडून समजताच राज्यातील पत्रकारांच्यात शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . तरी शासनाने त्यांच्यावर व त्यांच्या कुटूंबांवर दडपशाही पद्धतीने होणाऱ्या अन्याया विरोधात शासनाने तातडीने दखल घेऊन लोकशाहीतील महत्वपूर्ण घटकाला न्याय द्यावा . अशी मागणी ही खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली .


( अक्षयचंद्र जाधव )

Post a Comment

0 Comments