Ticker

6/recent/ticker-posts

पुष्कर तलावातील गाळ मोफत द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

 
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले :
शिखर शिंगणापूर ता माण येथील पुष्कर तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत उपसा करण्यास परवानगी द्यावी शिंगणापूर येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदारांना दि. १६ रोजी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. 
     महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री गाळमुक्त तलाव गाळमुक्त शिवार योजना अंतर्गत मोफत गाळ काढून देण्यात येत असून शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून शासनाच्या शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन गाळ माती उपसण्यास सुरुवात केली होती परंतु ग्रामपंचायत विरोधात सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे, अतुल करचे, सुनील ठोंबरे, सोमनाथ काटकर,अनिल करचे, बाळू करचे यांनी उपोषण करून शेतकऱ्यांना मोफत गाळ माती मिळावी यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत कडून शेतकऱ्यांना प्रति ब्रास 200 प्रमाणे कर आकारणी करण्यात येत होती ती बंद करून मोफत गाळमाती उपसा करण्यास परवानगी द्यावी. याबाबत उपोषण करण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायत यांनी शेतकऱ्यांना पैसे कमी केले नाहीत तर गाळ उचलणे बंद केले. 
  आता उन्हाळा संपत चालला असून लवकरच शेतकऱ्यांना नांगरट करावी लागणार असल्याने पुष्कर तलावांमधील असणारी गाळ माती मोफत उपसण्यास परवानगी द्यावी पुष्कर तलावातील गाळ माती उपसण्यास शेतकऱ्यांना परवानगी न दिल्यास ग्रामपंचायत कार्यालय येथे दि. १६ रोजी पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांनी सत्य सह्याद्रीशी बोलताना सांगितले आहे. 

   गाळमुक्त तलाव गाळमुक्त शिवार योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत गाळ काढण्यात येत असून याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालून शिखर शिंगणापूर येथील पुष्कर तलावा मधील असणाऱ्या गाळ माती मोफत काढण्यास शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीने परवानगी द्यावी. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले
           

शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत ने मोफत गाळ दिला नाही तर आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढा देणार आहोत जर न्याय नाही मिळाला तर आम्ही असेच आमरण उपोषण सुरू ठेवणार आहे.
 सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे शिखर शिंगणापूर

Post a Comment

0 Comments