सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: तब्बल पंधरा दिवसांहून अधिक काळ दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास सातारा शहर परिसराला झोडपून काढलेे. सकाळपासून वातावरण ढगाळ होते. तसेच हवेत गारवाही होता. रात्री 9 च्या सुमारास पावसाने सुरुवात केली. जोरदार पावसाने शहरात पाणी पाणी झाले होते. पावसामुळे गारठ्यात वाढ झाली. सध्या गणेशोत्सवाचे शेवटचे दिवस असून देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी उसळली असताना पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची त्रेधा-तिरपीट उडाली. गणेशोत्सव काळात पाऊस पडल्याने विसर्जनासाठी पावसाने हजेरी लावल्याने आनंदाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment