सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क.
तडवळे प्रतिनिधी -करपेवाडी तालुका पाटण येथील नावे नाभिक समाजाच्या भाग्यश्री माने हिचे अज्ञात समाजकंटकांनी हत्या केली त्या नराधमास त्वरित अटक करून कठोर शासन करावे .या मागणीसाठी खटाव तालुका नाभिक संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी खटाव तालुक्यातील सर्व नाभिक बांधव उपस्थित होते, निवेदनात पुढे म्हटले आहे की भाग्यश्री माने हिचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे सदरची घटना पाहता माणुसकीला काळीमा फासणारी आहे तसेच माने यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे या खुनाचा उलगडा न झाल्यास व दोषी आरोपींना तातडीने कारवाही करावी, अन्यथा 1 फेब्रुवारी रोजी पूर्ण सातारा बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध केला जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment