सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
तडवळे : -महाराष्ट्रात हादरून सोडलेल्या पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील घटनेने नाभिक समाजामध्ये भितीचे वातावरण निमार्ण झाले आहे. भाग्यश्री माने हिची हत्या केलेल्या नराधमास अटकेसाठी व निषेधार्थ सातारा बंद ची हाक आज जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी दिली. यावेळी खटाव तालुक्यातील सर्व नाभिक बांधव एकत्र येऊन वडू शहरात सर्व नागरिकांना उद्या बंद करण्याविषयी आव्हान करण्यात आले तसेच जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली त्यानंतर हुतात्मा स्मारकात भाग्यश्री हिला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खटाव तालुक्यातील सर्व नाभिक बांधव उपस्थित होते.
तर उद्या 1 फेब्रुवारी रोजी वडूज बंद करण्याचे आव्हान करण्यात आले.या या आव्हानास नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव यांनी पाठिंबा दर्शविला असून त्यांनी वडूज हे शांत शहर आहे तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी सर्व नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी बंद ठेवून नाभिक समाजाला पाठिंबा द्यावा असे त्यांनी म्हटले आहे यावेळी खटाव तालुक्यातील सर्व नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment