सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
विक्रम चोरमले / फलटण :- महाराष्ट्रातील धनगर समाजाने एस. टी.आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी तसेच सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी यासाठी धनगर समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.
बारामती येथे 2014 साली तमाम धनगर बांधवांनी फार मोठे आंदोलन केले होते या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्या आल्या सर्व धनगर समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यांना एस. टी. च्या सवलती देण्याचे बारामती येथे मान्य केले होते मात्र हे राज्य सरकार धनगर आणि धनगड "र" आणि "ड" च्या कचाट्यात पकडून धनगर समाजाची फसवणूक करीत असल्याचा निषेधार्थ फलटण येथील अधिकार गृहासमोर हजारो धनगर समाज बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत.
No comments:
Post a Comment