पिसाळलेली कुत्री अन् स्वयंघोषित छत्रपती, रामराजेंची जहरी टीका, - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, June 14, 2019

पिसाळलेली कुत्री अन् स्वयंघोषित छत्रपती, रामराजेंची जहरी टीका,

 
 
 
 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: साताऱ्यात जोपर्यंत ही पिसाळलेली तीन कुत्री आहेत, तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार, असा इशारा देताना रामराजे निंबाळकर यांनी खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांची तुलना कुत्र्याशी केली आहे. दरम्यान, रामराजे यांच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेली चार ते पाच दिवसापासून नीरा-देवघर पाणी पेटलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल  केलेल्या टीकेला आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजें यांना आवरावे, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू असा निर्वाणीचा इशारा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.
उदयनराजे यांनी नीरा देवघर पाणी प्रश्नावरून रामराजे नाईक निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही, असे उदयनराजेंनी म्हटले होते. 
सध्याच्या नीरा देवघरच्या पाणीप्रश्नावरून पेटलेल्या राजकारणामुळे राष्ट्रवादीतून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बाहेर पडणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेली अनेक दिवस छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामधील वाद विकोपाला गेला होता मात्र लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांची समजूत काढून खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी दिली यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी एकत्र येत खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार केला यामध्ये कराड येथे झालेल्या जाहीर सभेत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले होते की, श्रीमंत रामराजे हे माझे गुरु आहेत वक्तव्य केले होते यांचा धागा पकडत त्यांनी पलटवार केला की, पक्षात राहून पक्षाच्या विरोधात बोलण्याची सवय जात नसल्याने खासदार उदयनराजे यांना आवरा अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू असा इशारा दिला आहे.
उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, तुम्ही स्वयंघोषित छत्रपती आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही. त्यामुळे आपण दोन्ही स्वयंघोषित लोकांनी एकमेकांशी वाद घालणे योग्य नाही. तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि तुमचं मन थाऱ्यावर असेल तर एकदा खंडाळ्याच्या पलीकडे खिंडीजवळ नीरा उजवा कालवा आहे. उदयनराजेंनी त्याठिकाणी आपल्या लँडक्रुझर गाडीतून जावे आणि डाव्या दिशेने वळून आंदरूडपर्यंत प्रवास करावा. त्यावेळी उदयनराजेंना समजेल की, ज्या भागाला नीरा- देवघर योजनेतील पाणी कधीही मिळू शकत नव्हते अशा भागापर्यंत १०-१५ बोगदे पाडून मी कृष्णेचे पाणी पोहोचवले. त्यामुळे काहीजण मला भगीरथ म्हणत असतील किंवा मी गेली १५ वर्ष लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असेल तर तुम्हाला दु:ख होण्याचे कारण काय आहे, असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंना विचारला. 
तुम्हालाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता. या काळात तुम्ही काय केले? तुम्ही स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणवता माञ जावलीमध्ये तुम्ही काय काय करता त्याची फाईल माझ्याकडे आहे असे म्हणत तुम्ही कोणा कोणाला पैसे मागता,कोणा कोणाला ञास देता एनओसीसाठी लोकांकडून पैसे खाता. असले धंदे आम्ही कधी केले नाहीत.यामुळे जावलीत तुम्ही का मागे पडला व लोकांनी तुम्हाला का नाकारले.तर लोकसभा निवडणुकीमध्ये कराड येथील झालेल्या सभेत तुम्ही मला गुरू म्हणाला होता मात्र निवडणुक होताच तुम्ही शब्द फिरवायला सुरुवात केली यामुळे उद्या सातारा येथे होत असलेल्या मिटींगमध्ये पवार साहेबांना खासदारांना संभाळणार असला तर आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी द्या असे  खा.उदयनराजे भोसले यांच्यावर नाराजी व्यक्त केली. फलटणमध्ये येऊन तुम्ही आम्हाला बांडगुळ म्हणता. मात्र, याच बांडगुळांनी तुमच्या आधीच्या पिढीला सांभाळले होते, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत रामराजेंनी उदयनराजेंचा समाचार घेतला. पुढील काळात पाणीप्रश्नावरून राजकारण चांगलेच तापणार असून पुढील काळात याच विषयावरून बरीच राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, तुम्ही स्वयंघोषित छत्रपती आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही असा पलटवार पञकारपरीषदेत श्रीमंत रामराजे यांनी केले.

No comments:

Post a Comment