काँग्रेसला केवळ गृहीत धरुन चालणार नाही, अन्यथा कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही : आ. जयकुमार गोरे - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, July 10, 2019

काँग्रेसला केवळ गृहीत धरुन चालणार नाही, अन्यथा कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही : आ. जयकुमार गोरे



कोरेगाव,
कोरेगावचा आमदार आमचा होईल, नाही झाला तर आम्ही ठरवू तोच होईल. काँग्रेसला केवळ गृहीत धरुन आता चालणार नाही, काँग्रेसला विश्‍वासात न घेतल्यास कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा माढा केल्याशिवाय राहणार नाही, अशी तंबी काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे न घेता स्पष्ट शब्दात दिली. दरम्यान, हेच सांगण्यासाठीच मी कोरेगावात आलो आहे. माझी मनापासून इच्छा आहे की, कोरेगाचा आमदार किरण बर्गेच हवा, लोकांची तीच भावना आहे, असेही त्यांनी नमूद केले.
येथे झालेल्या एका कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी जोरदार बॅटिंग करत राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस भाषेत समाचार घेतला. राष्ट्रवादीचे संस्थापक-अध्यक्ष खा. शरद पवार व विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांना माझा विरोध केवळ राजकारणासाठी नाही, तर सातारा जिल्ह्याने सर्वाधिक प्रेम करुनही पाणी दिले नाही, म्हणून खासदार शरद पवार यांना तर 20 वर्षे मंत्री असूनही जिल्ह्याला पाणी देऊ शकले नाही म्हणून रामराजे नाईक-निंबाळकर यांना विरोध आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार्‍या जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना रखडविण्याचे पाप जलसंपदा खात्याचे माजी मंत्री म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांनीच केले आहे, असा आरोप त्यांनी केला. या योजनेविषयी आ. शशिकांत शिंदे हे चुकीची माहिती देऊन सर्वसामान्य जनतेची अक्षरश: दिशाभूल करत आहेत. योजनेचा हा विषय मंत्रिमंडळापुढे आलाच नाही. त्यामुळे त्यांनी आता या विषयावर जबाबदारीने बोलले पाहिजे, असेही आ. गोरे यांनी नमूद केले. 

No comments:

Post a Comment